वृत्त – माण, सातारा.
संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद.
माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी १७ जून २०२६ पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
“हा लढा शेतकऱ्यांच्या अस्मितेचा असून न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,” अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. महावितरणच्या कारभारामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर हे आंदोलन केंद्रित असणार आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या
🔹 शिंगणापूर फिडरवरील सध्या सुरू असलेले सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंतचे लोडशेडिंग बंद करावे.
भवानवाडी, खरात वस्ती, खांडे वस्ती, मुळीक वस्ती, एन ए प्लॉटिंग (शिवजीनगर), खांडे वस्ती, माने वस्ती आदी भागांना कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी द्यावी.
🔹 डी.पी.वरील फ्युज नवीन टाकण्यात यावेत व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडवाव्यात.
दहिवडी महावितरण कार्यालयासमोर उपोषण
हे बेमुदत उपोषण महावितरण कार्यालय, दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे १७ जूनपासून सुरू होणार असून शेतकरी, नागरिक आणि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.

