आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक
Trending

१५० गावांमध्ये शेतकऱ्यांशी होणार थेट संवाद ! कृषी विज्ञान केंद्र कालवडे यांच्याकडून विकसित कृषी संकल्प अभियानास प्रारंभ….

वृत्त दि.- गुरुवार, २९ मे २०२५

वृत्त – कराड, सातारा.


    भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कृषि विषज्ञान केंद्र, कालवडे, ता. कराड, जि. सातारा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर, कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान 29 मे ते 12 जून 2025 चा प्रारंभ कराड तालुक्यातील रेठेरे खुर्द या गावामध्ये गुरुवार दि. 29 मे रोजी गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांच्या हस्ते झाला.



       या अभियान अंतर्गत शेतकरी बांधवांबरोबर थेट संवाद कार्यक्रम, कृषि क्षेत्राचे नवीन तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया व नवीन प्रयोगांची माहिती संकलनाचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये राबवला जाणार आहे.



     कृषी विज्ञान केंद्र कालवडे मार्फत पुढील  आगामी 15 दिवसामध्ये कराड, पाटण,कोरेगाव,खटाव व माण तालुक्यातील सुमारे 150 गावामध्ये माहिती रथ जाणार आहे. यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद चे शास्त्रज्ञ डॉ. संतोष राठोड, डॉ.गोपाळकृष्ण,शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे प्राध्यापक डॉ.विकास कारंडे, कृषी संशोधन केंद्र, कराड चे शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत कांबळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.भरत खांडेकर, डॉ.निलेश थोरात, विषय विशेषज्ञ विशाल महाजन, डॉ.दिलीप घोंगडे,तसेच मंडळ कृषि अधिकारी अभिजित पाटील,तंत्रज्ञान साहाय्यक पवन जोशी,शुभप्रधा मोहिते, आत्मा विभाग, कराड च्या तंत्रज्ञान व्यवस्थापक पूनम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.



       सर्व उपस्थित अधिकारी यांनी शासकीय योजनांची व कृषि तंत्रज्ञान याची माहिती उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना दिली.अशा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसोबत सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कालवडे चे विश्वस्त श्री. गौरीशंकर कल्याणी व सौ. रोहिणी कल्याणी यांनी केले.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.