आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक

विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा : आमदार महेश शिंदे यांचे जाहीर आवाहन !

वृत्त दि.- ९ मे २०२५

वृत्त ‌‌‌- खटाव, सातारा.


     भारतीय कृषि अनुसंधान परिषद,नवी दिल्ली,कल्याणी गोरक्षण ट्रस्ट,कृषि विषज्ञान केंद्र,कालवडे,ता.कराड,जि. सातारा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर,कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषि संकल्प अभियान 29 मे ते 12 जून २०२५ यादरम्यान सातारा जिल्हा मध्ये होत आहे.



         याचाच एक भाग म्हणून खटाव गावामध्ये सोमवार दि.९ मे रोजी,कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन उपस्थित शेतकरी बांधवांना व सर्व अधिकारी मंडळींना मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले,सर्व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी घ्यावा व शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगतशील शेतकरी म्हणून शेती करावी. याचाच एक भाग म्हणून खटाव गावामध्ये सोमवारी कोरेगाव चे आमदार श्री. महेश शिंदे अभियान मध्ये सहभाग झाले व उपस्थित शेतकरी व अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यामध्ये ते म्हणाले सर्व शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी बांधव यांनी घ्यावा व शेतीचे नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करावे. तसेच वाढत्या सोयाबीन क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण वापर व शोध लावून सोयाबीन शेती अधिक किफायतशीर करावी असे आवाहन उपस्थित शेतकरी व कृषि शास्त्रज्ञ यांना केले.शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे,शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात त्यामुळे समृद्ध शेती झाली तर शेतकरी सुखी होईल आणि शेतकरी सुखी झाला तर जनता सुखी होईल. कृषी क्षेत्राला तसेच शेतकरी बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास सर्वोत्परीत ताकतीने सहकार्य केले जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली व विकसित कृषी संकल्प अभियानास अभिनंदन वजा शुभेच्छा दिल्या.



   ‌‌  यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषद चे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत कुमार,डॉ. आर एन सिंग,शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ चे प्राध्यापक डॉ .विकास कारंडे,कृषी संशोधन केंद्र,कराड चे शास्त्रज्ञ डॉ.चंद्रकांत कांबळे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.भरत खांडेकर,निलेश थोरात,विशाल महाजन,डॉ.दिलीप घोंगडे तसेच तंत्रज्ञान साहाय्यक पवन जोशी,शुभप्रधा मोहिते, आत्मा विभाग, खटाव चे तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश खिलारे हे उपस्थित होते.सर्व उपस्थित अधिकारी वर्गाने विविध प्रकारच्या शासकीय योजनांची व कृषि तंत्रज्ञान याची माहिती उपस्थित सर्व शेतकरी बांधव यांना दिली.



    अशा कार्यक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे विनम्र आवाहन कल्याणी गोरक्षण ट्रस्ट, कालवडे चे विश्वस्त गौरीशंकर कल्याणी व रोहिणी कल्याणी यांनी शेतकरी बांधवांना व जनतेला केले आहे.


चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.