महाराष्ट्र
Trending

मूकपद यात्रेसाठी दहिवडीत मोठ्या संख्येने शिवप्रेमी रस्त्यावर; शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचेकडून बलिदान मास सांगता !

वृत्त – माण, जि.सातारा

वृत्त दि. – बुधवार,१८ मार्च २०२६

संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद


    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देव, देश व धर्मासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव हिंदू समाजास व्हावी म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने १८ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास पाळण्यात आला.गेली ४० वर्षे हा बलिदानमास पाळला जातो.


      या पार्श्वभूमीला अनुसरून, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी बलिदान मासाची सुरुवात होऊन ते बुधवार दि.१८ मार्च रोजी बलिदान मासाची सांगता झाली.दहिवडी येथील छ.शिवाजी महाराज चौकात दररोज संध्याकाळी सात वाजता छ.संभाजी महाराज यांना श्लोक म्हणून, प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र घेऊन धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत होती.


   बलिदान मासानिमित्त दहिवडी येथील सुमारे शंभरहून अधिक तरुणांनी मुंडण केले. सुमारे एक महिना सर्व तरुणांनी एक वेळेचा उपवास केला.काही तरुणांनी चप्पल न घालण्याचा संकल्प केला .


      माण तालुक्यातील दहिवडी, बिदाल, गोंदवले बुद्रुक, म्हसवड, वडजल, मलवडी ,कुळकजाई, तोंडले,बोथे या सह अनेक गावांत बलिदान मास पाळण्यात आला.


      हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब याने पकडले. त्यांचा पाशवी छळ करून त्यांचा रोज एक-एक अवयव संपूर्ण महिनाभर तोडत होते. अंगाची साल सोलून काढत होते. शेवटी फाल्गुन अमावस्येचे दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे शस्त्राच्या साह्याने तुकडे तुकडे केले गेले. म्हणजेच श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने,बलिदानाच्या मार्गावर,संपूर्ण महिनाभर, रोजच अति धीरोदात्तपणे, चालत होते. म्हणून त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून, “धर्मवीर बलिदान मास” पाळला जातो.



      दहिवडी शहरात दररोज सायंकाळी तरुण, शालेय मुले, नागरिक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जमत होते. शहरात दररोज शिवप्रतिष्ठानचे धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दररोज नतमस्तक होऊन पूजन करत असत.फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच, सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास हा पाळला जातो.



      या संपूर्ण काळात; एकवेळचे जेवण करणे, मिष्टान्न न खाणे, चहा, पान-तंबाखू सेवन न करणे, टीव्ही अथवा चित्रपट न पाहणे, पायात पादत्राणे न घालणे हे सर्व किंवा यामधील एक गोष्ट सोडणे. हा सुतकाचा महिना असल्याने आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे. नविन खरेदी न करणे, लग्नसमारंभ व शुभप्रसंग आयोजित न करणे रोज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सायंकाळी धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची प्रतिमा लावून, त्यास रोज पुष्प अर्पण करून, त्यासमोर प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र आदी म्हणून, श्री संभाजीसूर्यहृदय म्हणून रोज श्रद्धांजली वाहिली जात होती. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण करुन मुकपदयात्रेचे आयोजन केले जाते.


         मुकपदयात्रा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांना औरंग्याने क्रूरपणे हाल हाल करून प्रतिदिवस एक एक अवयव तोडत एक महिनाभर छळ करत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला मारून टाकले, त्यांचे तुकडे भिमा इंद्रायणी नदीच्या संगमात टाकुन दिले.


         हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची हि अवस्था केली गेली यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शरिराला निटसा मंत्राग्नी ही दिला गेला नाही आणि त्यांची अंत्ययात्राही काढली गेली नाही म्हणुन त्यांच्या या दिव्य व ज्वलज्वलनतेजस बलिदान स्मरुण त्यांची कधी न निघालेली अंत्ययात्रा काढणे म्हणजेच “ मुकपदयात्रा” होय.


          फाल्गुन अमावस्येला म्हणजेच आंग्ल दि. १८ मार्च बुधवार रोजी सायंकाळी ठिक ६:३० वा दहिवडी शहरात मुकपदयात्रेच आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान माण तालुक्याच्या वतीने करण्यात आले होते. या मुकपदयात्रेची सुरुवात हि छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून होऊन पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – बाजार पटांगण – चावडी चौक – सुतार गल्ली – श्री गणेश मंदिर -‌ आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक चौक – बाजार पटांगण मार्गे – छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे येऊन ध्येयमंत्र व श्री संभाजीसुर्यह्यदयजाळाचे पठण करुन समारोप झाला. यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रध्दांजली वाहण्यासाठी दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीसह माण तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी, हिंदू धर्म बांधवांनी तसेच सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माण तालुका यांच्या वतीने पाळण्यात आलेला बलिदान मास व मूकपद यात्रा यामुळे परिसरात श्री छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदराची व कृतज्ञतेची भावना मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. “देहाचा त्याग केला, पण स्वाभिमान सोडला नाही, शंभूराजांचा बलिदान मराठा इतिहास विसरणार नाही!”



अशा “मृत्युंजयास” लोकसेवा टाइम्स माध्यमाचा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा !

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.